महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाणार संघर्ष : भाजपचं कपटी राजकारण कोकणी जनता ओळखून आहे - भास्कर जाधव

भाजपचे राज्य महासचिव प्रमोद जठार हे नुकतेच रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी रिफायनरी प्रकल्प उभारणीबाबत केंद्र शासनाने राज्य शासनाला दोन महिन्याचा अल्टिमेट दिला आहे, अशी माहिती दिली होती. हा प्रकल्प आल्यास दोन्ही जिल्ह्यातील बेरोजगारी दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात लक्ष घालून हा प्रकल्प जनतेच्या भल्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी कोकणात आणावा, असे आवाहनही केले होते. हाच मुद्दा पकडत आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

By

Published : Jul 26, 2020, 11:23 AM IST

bhaskar jadhav, mla
भास्कर जाधव

रत्नागिरी - भाजपमधील मंडळींच्या वक्तव्यात कुठेतरी कपटकारस्थान आणि राजकीय स्वार्थ दडलेला असतो, अशी टीका शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली. ते काल (शनिवारी) चिपळूणमध्ये बोलत होते. याच मुद्द्यावरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपला लक्ष केले.

भाजपचे राज्य महासचिव प्रमोद जठार हे नुकतेच रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी रिफायनरी प्रकल्प उभारणीबाबत केंद्र शासनाने राज्य शासनाला दोन महिन्याचा अल्टिमेट दिला आहे, अशी माहिती दिली होती. हा प्रकल्प आल्यास दोन्ही जिल्ह्यातील बेरोजगारी दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात लक्ष घालून हा प्रकल्प जनतेच्या भल्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी कोकणात आणावा, असे आवाहनही केले होते. हाच मुद्दा पकडत आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यामुळे रिफायनरीच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे.

भास्कर जाधव (आमदार, शिवसेना)

ते म्हणाले, 'भाजपची नेते मंडळी सध्या या रिफायनरीवरुन शिवसेनेला दोष देत आहेत. हा प्रकल्प आल्यानंतर कोकणातील बेरोजगारी दूर होईल, अशी वक्तव्ये सातत्याने करत आहेत. मात्र, भाजपच्या लोकांची आपण कायमची जर पद्धत बघितली, तर त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात कुठेतरी कपटकारस्थान आणि राजकीय स्वार्थ दडलेला असतो. दुसऱ्याला पुढे करुन आपला हेतू साध्य करणे, ही त्यांची प्रवृत्ती आहे.

नाणार प्रकल्पाबाबत तुम्हाला जर इतकेच प्रेम आले होते तर मागच्याच सरकारमध्ये तुमच्याच पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांनीच नाणार प्रकल्प रद्द केला आहे, त्यावेळी केंद्रातही सरकार तुमचेच होते. राज्यातही मुख्यमंत्री तुमचेच होते. आज तुम्ही कोकणातील बेरोजगारीबद्दल आणि तरुणांबद्दल जे काही शब्दातून प्रेम दाखवत आहात, ते प्रेम नाही. तर तुमचे कपटी राजकारण आहे, हे कोकणी जनता पूर्णपणे ओळखून आहे, यामुळे भाजपाच्या वक्तव्यांना कोकणातील मंडळी फार काही दाद किंवा महत्त्व देणार नाही, अशी टीका आमदार जाधव यांनी केली.

दरम्यान, या प्रकल्पाबाबत शिवसेनेने आपली भूमिका यापूर्वीच जाहीर केली आहे आणि ती आजही कायम आहे. मात्र, भाजपची भूमिका सातत्याने बदलत आहे. त्यामुळे नक्की भूमिका काय हे एकदा भाजपला लोकांसमोर जाहीर करावे लागेल, असे आमदार भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details