महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी खासदार राजू शेट्टींनी साधला भाजपवर निशाणा

माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपवर टीका केली, यावेळी ते म्हणाले भाजपने जनतेचा भ्रमनिरास केला असून त्यांच्या पतनाची आता सुरुवात झाली आहे.

By

Published : Jan 9, 2020, 5:17 PM IST

raju-shetty-has-criticized-the-bjp
माजी खासदार राजू शेट्टीनी साधला भाजपवर निशाणा

रायगड - शेतीवर असलेली लोकसंख्या कमी करण्यासाठी शेतीबरोबर पूरक व्यवसाय देण्याची गरज आहे. तरच शेतीवरील काम करणारी लोकसंख्या कमी होईल. कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्याला लावलेली सलाईन आहे. भाजपने जनतेचा भ्रमनिरास केला असून त्याच्या पतनाची आता सुरुवात झाली आहे. ज्या पक्षाची ताकद ज्या जिल्ह्यात आहे. त्या पक्षाला पालकमंत्री पद दिले जाते. कोल्हापूरमध्ये बाहेरचा पालकमंत्री दिला असला तरी ती एक सोय असते आणि त्याच जिल्ह्यातील असला पाहिजे असे काही नाही. असे उत्तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिले.

माजी खासदार राजू शेट्टीनी साधला भाजपवर निशाणा

अलिबाग पीएनपी नाट्यगृह येथे जागतिक मराठी अकादमी संमेलनाच्या समारोप कार्यक्रमला खासदार राजू शेट्टी उपस्थित होते. या कार्यक्रमात त्याच्या प्रकट मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीनंतर ईटीव्ही भारतला त्यांनी मुलाखत दिली. मुलाखतीत शेतीववरील लोकसंख्या कमी होणे गरजेचे आहे. याबाबत शेट्टी याना प्रश्न विचारला असता शेतीचे तुकडे झाले आहेत. त्यातच शेती करणे परवडत नाही. त्यामुळे शेतीवर कुटूंब चालवणे शेतकऱ्याला कठिण झाले आहे. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय देणे गरजेचे आहे. शेतीला पूरक व्यवसाय दिला गेल्यास शेतीवर उदरनिर्वाह होणारी लोकसंख्या कमी होण्यास मदत मिळेल. यासाठी सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे, असे उत्तर खासदार शेट्टी यांनी दिले.

राज्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे, याबाबत ते म्हणाले, भाजप हा भ्रष्ट्राचार मुक्त भारत आणि विकासाच्या मुद्यावर सत्तेत आला होता. मात्र, भाजपने भ्रष्टाचार मुक्त भारत केला नाही, विकासाचे मॉडेल केले नाही उलट जातिजाती मध्ये तेढ निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाजप हा जनतेच्या मनातून उतरला आहे. भाजपला आता जनता नाकारू लागली आहे, असे शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधला.

कर्जमाफी ही म्हणजे तात्पुरती मलमपट्टी आहे. कर्जमाफी ही शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. मात्र, कर्जमाफी दिल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना उभे राहण्याचे बळ सरकारने देणे गरजेचे आहे, असेही शेट्टी म्हणले. पालकमंत्री ही एक सोय असून जिल्ह्याचाच मंत्री पालकमंत्री असणे गरजेचे नाही, असे मार्मिक उत्तर यावेळी त्यानी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details