रायगड : मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग मांडावा समुद्री मार्गावर आजपासून वॉटरटॅक्सीला ( Mumbai to Alibaug water taxi ) सुरुवात करण्यात (water taxi starting from today ) आली आहे. पारंपरिक बोटीने 3 तास लागणाऱ्या प्रवास आता 45 मिनिटात करणे आता शक्य होणार आहे. यामुळे कोकण पर्यटन आणि व्यवसायाला भरारी मिळणार आहे.
एकाचवेळी 199 प्रवाशांची वाहतूक -रस्त्यांवरील रहदारीचा ताण कमी करण्यासाठी आणि जलदगतीने प्रवास होण्यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू असून, भाऊचा धक्का ते बेलापूर बेलापूर ते जेएनपीटी आणि बेलापूर ते एलिफंटा अशा तीन मार्गांवरील वॉटर टॅक्सी सेवेला सुरुवात झाली होती. तर आज पासून मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग, मांडावा वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. एकावेळी 199 प्रवाशांची वाहतूक या सेवेच्या माध्यमातून केली जाणार आहे.