रायगड- जिल्ह्यात ४ दिवसापासून पावसाच्या अधूनमधून सरी कोसळच आहेत. तर आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणात पुन्हा एकदा थंडावा पसरला आहे.
रायगडमध्ये दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
रायगड जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावासाला सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणात पुन्हा एकदा थंडावा पसरला आहे.
४-५ दिवसापासून जिल्ह्यात सकाळी सूर्यदर्शन होत असून दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. तर आज सकाळपासून जिल्ह्यात कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे वातावरणात गर्मी वाढली होती. मात्र, दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार सुरुवात केल्याने वातावरण थंड झाले आहे.
जिल्ह्यात अलिबाग, रोहा, पेण, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन या भागात दुपारनंतर पावसाने जोरदार सुरुवात केली होती. हा पाऊस शेतीसाठी चांगला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, यावेळी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण दरवर्षीपेक्षा कमी असल्याचेही बोलले जात आहे.