पुणे- देवाच्या आळंदी नगरीमध्ये आषाढी वारीला आज सुरुवात होत असताना माऊलींच्या पालखीचे प्रस्थान सायंकाळी चारनंतर होणार आहे. इंद्रायणी घाटावर वारकर्यांसह भाविकांनी गर्दी केली असून इंद्रायणी नदीमध्ये स्थान करून माऊलींच्या दर्शनाला प्रत्येकजण जात आहे.
आळंदीत हजारो वारकरी दाखल; प्रशासनाचा असा आहे बंदोबस्त
इंद्रायणी घाटावरती भक्तीमय वातावरणात हा सोहळा रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर इंद्रायणी घाटावर येणाऱ्या वारकरी व भाविकांसाठी पोलीस नगरपरिषद यांच्या माध्यमातून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली.
इंद्रायणी घाटावर भक्तिरसात रमला वारकरी; प्रशासनाचा असा आहे बंदोबस्त
इंद्रायणी घाटावरती भक्तीमय वातावरणात हा सोहळा रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर इंद्रायणी घाटावर येणाऱ्या वारकरी व भाविकांसाठी पोलीस नगरपरिषद यांच्या माध्यमातून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. घाटाच्या सर्व बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात आलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. इंद्रायणी घाटावर भक्तीचा हा सोहळा होत असताना आळंदी नगरीत आलेला वारकरी, भाविक मोठ्या भक्तिभावाने या सोहळ्यात सहभागी होत आहेत.