पुणे -दहावी, बारावीचा निकाल ( 10th 12th Result ) वाढविण्यासाठी गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ( Zilla Parishad ) समग्र गुणवत्ता विकास कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर आता ( Zilla Parishad Total Quality Development Programme ) जिल्हा परिषदेने शाळांना श्री पॉइंट चॅलेंज देण्यात ( Zilla Parishad three point challenge to schools ) आले आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेने निकाल वाढविण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवणे, सर्व विषयांमध्ये सरासरी गुणांमध्ये १० टक्के वाढ तसेच पहिल्या दहा विद्यार्थ्याचे सरासरी गुण दहा टक्क्यांनी वाढविण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
जिल्ह्यातील 79 शाळांवर लक्ष केंद्रित -जिल्हा परिषदेने ७५ दिवसांचा समग्र गुणवत्ता विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. यात जिल्ह्यातील 79 शाळांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.हे थ्री पॉईंट चॅलेंज स्वीकारल्यानंतर शाळांनी प्रत्येक वर्षासाठी व प्रत्येक विषयासाठी उद्दिष्ट ठरवायचे आहे. त्यानंतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय नियोजन करायचे आहे. सराव परीक्षा घेऊन त्यासाठी अतिरिक्त अभ्यास साहित्य द्यावे. अभ्यासक्रमातील कठीण मुद्दयांबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांना मदत करणे. याचे नियोजन शाळांनी करणे अपेक्षित आहे.