महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 10, 2021, 10:03 AM IST

ETV Bharat / state

सोडून दिलेल्या पत्नीसोबत लग्न केल्याच्या रागातून तिघांवर जीवघेणा हल्ला

सोडून दिलेल्या पत्नीसोबत लग्न केल्याच्या रागातून 12 जणांच्या टोळक्याने एका महिलेसह तिघांवर तीक्ष्ण हत्याराने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तक्रारदाराच्या हाताची बोटे तुटली आहेत.

तिघांवर जीवघेणा हल्ला
तिघांवर जीवघेणा हल्ला

पुणे- सोडून दिलेल्या पत्नीसोबत लग्न केल्याच्या रागातून 12 जणांच्या टोळक्याने एका महिलेसह तिघांवर तीक्ष्ण हत्याराने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शहरातील वाकडेवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीच्या हाताची बोटे तुटली असून, दुसरे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात बाजीराव हैदर शफा इराणी (वय 24) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्ली अब्बास शॉकत इराणी याच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदारासह नातेवाईकांवर हल्ला-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्ली याचे लग्न झाले होते. पण त्याने पत्नीला सोडून दिले. यानंतर तक्रारदाराने त्याच्या पत्नीसोबत विवाह केला. याचा आरोपीला राग आला होता. दरम्यान, शनिवारी वाकडेवाडी परिसरात तक्रारदार आणि त्याचे नातेवाईक बोलत बसले असताना १२ आरोपींनी एकत्र येत कोयते तसेच तीक्ष्ण हत्यारांची भीती दाखवत तक्रारदारासोबत वाद घातला. तसेच त्यांच्यावर धारधार शस्त्रांच्या सहाय्याने वार केले. यात तक्रारदाराच्या हाताची बोटे तुटली.

तसेच या हल्ल्यात तक्रारदाराची मावशी व मामाच्या मुलाच्या डोक्यावर वार झाल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या हल्याने वाकडेवाडी परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत, पुढील तपास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details