महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Punyeshwar Temple Pune : सरकारने पुण्यश्वर मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करावे; तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर यांची मागणी

तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर सरकारने पुण्यश्वर मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करावे, अशी मागणी सरकारला केली आहे. ते म्हणाले की, पुणे शहराला पुण्यश्वर मंदिरामुळे ओळख आहे. त्यामुळे मला सरकारला विचारायचे आहे की, येत्या काळात ज्या सरकारला बहुमत हवे असेल त्या सरकारने पुण्यश्वर मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करावे. पुण्यात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

By

Published : Jan 22, 2023, 9:23 PM IST

Punyeshwar Temple Pune
पुण्यातील हिंदू जन आक्रोश मोर्चा

पुण्यात सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेला हिंदू जन आक्रोश मोर्चा

पुणे : पुण्यातील कसबा पेठ येथील पुण्येश्वर मंदिर आता यासाठी यादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले होते. तसाच वाद आता पुढे आला असून तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर सरकारने पुण्यश्वर मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करावे, अशी मागणी केली आहे.

आमदार राजू भैय्यांची मागणी : आमदार राजा भैया ठाकूर म्हणाले की, पुणे शहराला पुण्यश्वर मंदिरामुळे ओळख आहे. त्यामुळे मला सरकारला विचारायचे आहे की, येत्या काळात ज्या सरकारला बहुमत हव आहे. त्या सरकारने पुण्यश्वर मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करावे. तुम्ही बुलडोझर तयार ठेवा. तुमच्यासोबत हिंदू सरकार असून पुण्यश्वर मंदिराच्या जागी भव्य अस महादेवाचे मंदिर उभारण्यात यावे, अशी भूमिका तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर यांनी मांडली. तसेच मी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती केली आहे. त्यामुळे लवकरच पुण्येश्वरच्या आरतीला देखील येणार असून तुमच्या येथे पण एक अयोध्या आहे. ही बाब लक्षात घेऊन तुम्ही सर्वांनी राज्य सरकारवर दबाव आणला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हिंदू जन आक्रोश मोर्चा : पुण्यात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार भीमराव तापकीर, तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई, निवृत्त पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे सह मोठ्या प्रमाणात हिंदू नागरिक हे सहभागी झाले होते. धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा, या मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला होता.

धर्मवीर दिन म्हणून घोषित करावा : तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर यावेळी म्हणाले की, मी आज पुण्यात हिंदू जन आक्रोश मोर्चाला आलो आहे. हा आक्रोश नसून गर्जना आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या दिवशी मारले त्या दिवसाला धर्मवीर दिन म्हणून घोषित करा, अशी माझी मागणी आहे. जोवर आपली मागणी होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरू असला पाहिजे. तसेच देशात अनेक ठिकाणी लव्ह जिहाद, धर्मांतर, गो हत्या सारख्या घटना समोर येत आहे. या विरोधात कायदा झाला पाहिजे.

लव्ह जिहाद प्रकरणावर संतप्त प्रक्रिया : देशात लव्ह जिहादचे षडयंत्र पसरले असून ते उखडून टाकायचे आहे.या बाबत कायदा जर झाला नाही. तर आपल्या माता भगिंना सुरक्षित कशा राहतील.जो लांडा किसी बेहेन को देखेगा उसकी आखे हमे निकालनी आती है, असे विधान त्यांनी केले. धर्मांतर विरोधात सुद्धा एक कायदा तयार झाला पाहिजे.जो धर्मांतर करेल त्याला खड्ड्यात तीन फूट खोदा आणि गाढून टाका. मी 2005 मध्ये केले. त्यामुळे माझ्या भागात धर्मांतर झाल नाही आणि होत नाही. तसेच गाय आमची माता आहे. तिला आम्ही कापू देणार नाही. कायदा बनवा नाही तर आम्ही कसाई यांना छाटू, अशी भूमिका देखील त्यांनी यावेळी मांडली.

भीतीला वाचा फोडण्यासाठी मोर्चा : मोर्चात सहभागी झालेले भाजपाचे आमदार शिवेंद्र राजे भोसले म्हणाले की, हिंदू समाजाला जे भीतीचे वातावरण झाले आहे. त्या भीतीला वाचा फोडण्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला आहे. प्रत्येक शहरात तालुक्यात असे मोर्चे काढले जात आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी आमच्याच विचारांच सरकार असल्याने सरकार निश्चित दखल घेईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यामध्ये धर्माचे रक्षण करणे हा देखील भाग होता. त्याचबरोबर आम्ही कोणाच्याही विरोधात नाही. आम्ही धर्म रक्षणच कार्य करीत आहोत. आत्तापर्यंत आपण जो इतिहास वाचला. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीर म्हणूनच आहे. त्यामुळे कोणी काही म्हणू द्या, छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीरच आहे आणि कायम राहणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

अजित पवारांवर टीकास्त्र : हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी अजित पवार यांच्या विधानाचा चांगलाच समाचार त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते म्हणणारे शाहीस्तेखान,अफजलखान यांच्या कुळातलेच असावे. धरणात मुतणारे आता इतिहासात मुतायला लागेल आहेत. कदाचित तुम्ही पवार नसला पण छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच होते, अशा शब्दात हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर त्यांनी टीका केली आहे.

हेही वाचा : MLA Shivendra Raje : छत्रपती संभाजी महाराजांची धर्मरक्षक म्हणून इतिहासात ओळख, आमदार शिवेंद्रराजे यांचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details