पुणे- युती सरकारच्या काळात एमपीएससीची सर्वात मोठी भरती झाली होती. मात्र, सध्याचे आघाडी सरकार आल्यानंतर त्यांना अजूनही या निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देता आलेली नाही. या सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे तसेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयात या सरकारने योग्य बाजू न मांडल्याने मोठा घोळ झाला आहे, अशी टीका भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
खंडपीठाने सांगून देखील हे सरकार नियुक्तीपत्रे देत नाही. महाराष्ट्रातील गोर-गरिबांची मुले यामध्ये आहेत, त्या मुलांना ताबडतोब नियुक्ती द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे पडळकर म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. या मुलांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. आपल्या मागणीसाठी आपली बाजू मांडण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यात एकत्र येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकारने पोलिसांचा दबाव आणून त्यांना त्यांची भूमिका मांडू दिली नाही, हे सरकार दडपशाही करत असल्याचे पडळकर म्हणाले.
सरकारने विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ आणू नये