परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर काही थांबेना...
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील अनेक कंपन्या, व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील एमआयडीसी आणि इतर उद्योगधंदे हळूहळू पूर्ववत होताना दिसत आहेत. परंतू, असे असले तरी परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर थांबताना दिसत नाही.
पुणे - लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील अनेक कंपन्या, व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील एमआयडीसी आणि इतर उद्योगधंदे हळूहळू पूर्ववत होताना दिसत आहेत. परंतू, असे असले तरी परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर थांबताना दिसत नाही. या कामगारांनी परत जाऊ नये, राज्यातच थांबावे यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात या कामगारांसाठी राहण्याची आणि खाण्याची सोय केली आहे. तात्पुरते निवारा केंद्र उभारली आहेत. असे असतानाही अनेक कामगार आपापल्या राज्यात जाण्यावर ठाम आहेत.