महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 6, 2019, 11:50 AM IST

ETV Bharat / state

भोरमध्ये दोघा मावसभावांचा नीरा नदीत बुडून मृत्यू, गावावर शोककळा

दरम्यान, नदीत गाळ जास्त असल्याने गाळात फसून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.

भोरमध्ये दोघा मावसभावांचा नीरा नदीत बुडून मृत्यू

पुणे - येथील भोर तालुक्यातील चिखलावडे गावात दोन मावसभावांचा नीरा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या दोघा मावसभावांचा करूण अंत झाल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनिकेत शंकर कोंढाळकर आणि मिलिंद जाधव अशी दोघांची नावे आहेत.

भोरमध्ये दोघा मावसभावांचा नीरा नदीत बुडून मृत्यू, गावावर शोककळा

याबाबत वृत्त असे, की मिलिंद हा मूळचा नारायणपूरचा आहे. आणि तो सुट्टीनिमित्त मामाच्या गावी आला होता. मावसभाऊ अनिकेत आणि मित्रांसोबत तो नदीवर पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, नदीत गाळ जास्त असल्याने गाळात फसून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details