महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये किरकोळ वादातून भावाच्या मारहाणीत चुलत बहिणीचा मृत्यू

नाशिकमध्ये किरकोळ वादातून भावाच्या मारहाणीत चुलत बहिणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी रविवार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

By

Published : Apr 6, 2020, 6:57 PM IST

woman-murdered-over-minor-controversy-in-nashik
नाशिकमध्ये किरकोळ वादातून भावाच्या मारहाणीत चुलत बहिणीचा मृत्यू

नाशिक - घराच्या गच्चीवरील प्लायवूडवर पाणी का मारले याचा जाब विचारल्याने चुलत भावाने बहिणीला बेदम मारहाण करत तिचे डोके फरशीवर आदळले. या घटनेत उपचार सुरू असतांना महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या रविवार पेठ परिसरात घडली. अश्विनी संतोष चव्हाण असे मृत महिलेचे नाव असून दिगंबर उर्फ भैय्या संजय चव्हाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे.

नाशिकमध्ये किरकोळ वादातून भावाच्या मारहाणीत चुलत बहिणीचा मृत्यू

3 एप्रिलला घराच्या गच्चीवरील प्लायवूडवर पाणी का टाकले अशी अश्विनी चव्हाण यांनी दिगंबर चव्हाण यांना विचारणा केली. याचा राग आल्याने दिगंबर चव्हाण यांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी त्यांचे भाऊ मध्यस्थीला आले असता त्यांनाही दिगंबर चव्हाण यांनी मारहाण केली. या मारहाणीत अश्विनी यांचे केस पकडून त्यांचे डोके फरशीवर आदळल्याने त्या जखमी झाल्या. या प्रकर्णी पोलीस ठाण्यात तक्रार करून त्या घरी आल्या असता त्या चक्कर येऊन खाली पडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिगंबर चव्हाण यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details