नाशिक - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचा शेतकरी मोर्चा नाशिकहून मुंबईकडे रवाना होत असून, या मोर्चात राज्य भरातून शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत. 25 जानेवारी रोजी मुंबईतील राजभवणावर हा मोर्चा धडकणार आहे, तर मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या सभेत शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे देखील सहभागी होणार आहेत.
हेही वाचा -अज्ञात व्यक्तीने फवारणी टाकीत तणनाशक टाकल्याने द्राक्ष बागेचे नुकसान
केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. दिल्लीत एवढ्या दिवसापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. आतापर्यंत 140 शेतकरी या आंदोलनादरम्यान हुतात्मा झाले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांची परवा नाही, ते एकही मागणी मान्य करत नाही. शेतकरी विरोधी कायदे व्हावेत याबाबत एकाही शेतकरी संघटनेने मागणी केली नव्हती. हे कायदे परस्पर लागू करून मोदी सरकारने लोकशाहीची हत्या केली. तसेच, कामगार विरोधात चार कायदे त्यांनी लागू केल्याचे अखिल किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी म्हटले.