महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 7, 2019, 1:34 PM IST

ETV Bharat / state

शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सुटले नाही तर आम्ही राजभवनावर आंदोलन करू- बच्चू कडू

सत्ता स्थापन जेव्हा होईल तेव्हा होईल, मात्र आधी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली पाहिजे. मदत जाहीर न केल्यास आम्ही राज्यपालांच्या बंगल्यावर मोर्चा काढू. याबाबत मी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटायला आलो असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

बच्चू कडू

मुबई- सत्ता स्थापन जेव्हा होईल तेव्हा होईल, मात्र आधी राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली पाहिजे. मदत जाहीर न केल्यास आम्ही राज्यपालांच्या बंगल्यावर मोर्चा काढू. याबाबत मी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटायला आलो असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांच्याबरोबर मेळघाटचे आमदार राजकुमार पटेलही उपस्थित होते.

प्रतिक्रिया देताना आमदार बच्चू कडू

युतीमधील घटकपक्षांमध्ये सरकार स्थापनेसाठी मध्यस्थी करणार का, या प्रश्नावर युतीचे पेचप्रसंग सोडवण्याइतका मी मोठा नाही. राज्यपालांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केले पाहिजे. जर, अनुदान जाहीर केले नाही तर राज्यपालांच्या घरापुढे आंदोलन करू, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

हेही वाचा-मातोश्रीवर शिवसेनेची बैठक सुरू, आमदारांना मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव..

ABOUT THE AUTHOR

...view details