मुंबई- लवकर जाण्याचा घाईत रेल्वे रूळ ओलांडताना अनेक प्रवासी आपला मौल्यवान जीव गमावून बसतात. अनेक उपाययोजना, जनजागृती करूनही प्रवासी ऐकत नाही. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बल व पश्चिम रेल्वेने अंधेरी, मालाड, माहिम व दादर स्थानक परिसरात रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांसाठी जनजागृती मोहीम राबवली. यावेळी रूळ ओलांडणाऱ्यांवर प्रत्यक्षात यमदूताने कारवाई केली.
रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी वारंवार स्थानकांवर उद्घोषणा केली जाते. मात्र, प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव गमावून बसतात. अनेक उपाययोजना, जनजागृती करूनही प्रवासी ऐकत नाही. त्यामुळे आज पश्चिम रेल्वेने एक वेगळा प्रयोग राबवत जनजागृती केली. यावेळी जो कोणी रेल्वे रुळ क्रास करेल त्याला यम उचलून नेत होता.