महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत काँग्रेसच्या 'या' तीन दिग्गजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार संजय निरुपम, उत्तर मध्यच्या उमेदवार प्रिया दत्त, उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज उमेदवारी दाखल केले.

By

Published : Apr 25, 2019, 1:34 PM IST

प्रिया दत्त, संजय निरुपम, उर्मिला मातोंडकर

मुंबई - काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आगे बडो हम तुम्हारे साथ है, या घोषणेने आज वांद्रे जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. कारण उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार संजय निरुपम, उत्तर मध्यच्या उमेदवार प्रिया दत्त, उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आज वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज उमेदवारी दाखल केले. यावेळी या तिन्ही उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

मुंबईत काँग्रेसच्या 'या' तीन दिग्गजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

लोकांकडून सहकार्याची अपेक्षा बाळगते अशी प्रतिक्रिया उत्तर मुंबई लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी अर्ज भरल्यावर व्यक्त केली.
भाजपच्या जाहीरनाम्याबद्दल निरुपम यांना विचारले असता ते म्हणाले, जेंव्हा जेंव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा तेव्हा भाजपला राम मंदिरची आठवण येते. राम मंदिर व्हावे ही सर्वांची इच्छा आहे, मात्र ते प्रकरण न्यायालयात आहे, न्यायालयाचा निर्णय होऊ द्या असे निरुपम म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details