महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसामुळे तलावातील पाणी पातळीत वाढ, मुंबईकरांना पुढील 28 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा

गेल्या तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे मुंबईतील तलावांमधील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत तलावात १ लाख ४ हजार ४९६ दशलक्ष लिटर इतका म्हणजे पुढील २8 दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे.

By

Published : Jul 1, 2019, 1:01 PM IST

Updated : Jul 1, 2019, 1:09 PM IST

पाणीसाठा

मुंबई -मागील वर्षी परतीचा पाऊस न पडल्यामुळे पालिकेला राखीव पाणीसाठा वापरावा लागत होता. मात्र गेल्या तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे मुंबईतील तलावांमधील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत तलावात १ लाख ४ हजार ४९६ दशलक्ष लिटर इतका म्हणजे पुढील २8 दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे.

गेल्या २४ तासात पडलेल्या पावसामुळे एका दिवसात ४ दिवसाचा पाणीसाठा वाढला आहे. मुंबईसह ठाणे जिल्हयात गेले चार दिवस समाधानकारक पाऊस पडत आहे. पावसामुळे शुक्रवारी तलावांत ७१ हजार १७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. शनिवारी तलावांत ७६ हजार ८३३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला होता. तर रविवारी सकाळी तलावांत ८७ हजार ६४८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला. सतत पडणाऱ्या पावसामुळे आज सकाळी सहा वाजेपर्यंत १ लाख ४ हजार ४९६ इतका पाणीसाठा जमा झाला आहे.


हा पाणीसाठा मुंबईकरांना पुढील २८ दिवस पुरेल इतका आहे. जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात चांगला पाऊस पडून मुंबईला लागणारा पाणीसाठा तलावांमध्ये जमा झाल्यास मुंबईत सध्या सुरू असलेली १० टक्के पाणी कपात रद्द केली जाऊ शकते.


तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

  • अप्पर वैतरणा -: ० (शून्य)
  • मोडकसागर -: ३५,२०५
  • तानसा -: ११,६६५
  • मध्य वैतरणा -: ३९,०५१
  • भातसा -: १०,६३७
  • विहार -: ४,७९६
  • तुळशी -: ३,१४३
  • एकूण -: १,०४,४९६
Last Updated : Jul 1, 2019, 1:09 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details