मुंबई: काँग्रेस पक्ष्याला १३८ वे वर्ष होत आहे. त्याच दिवशी सभेतून शेकडो कार्यकर्ते मागच्या मागे खुर्चीवरून गायब होतात. सुमारे 20 वर्षांनंतर काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले. मल्लिकार्जुन खरगे त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात गुजरात हिमाचल विधानसभा निवडणूक पार पाडली. आता मुंबई महापालिकेच्या निवडणूकिसाठी आतापासून काँग्रेस पक्षाने कंबर कसल्याचे दिसत आहे, असे वाटत होते. (Mumbai Congress ) मात्र मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भाई जगताप जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा मागच्या खुर्च्यांवरील हजारो लोके पसार झाले. काँग्रेस अध्यक्ष यांच्या नजरेतून ही सुटली नसणार हे मात्र नक्की. ( language of Mumbai Congress leaders ) एकीकडे काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्यासमोर भाई जगताप म्हणत होते की, आपण निर्णय घ्या मुंबईची निवडणूक स्वतंत्र लढू आणि स्वबळावर मुंबईमध्ये सत्ता मिळवू मात्र त्याच वेळी शेकडो लोके घोळक्याने पसार होत होती. ( Mumbai Congress leaders is selfsufficient ही दखल घेण्याजोगीबाब आहे. ( activists in last row of meeting spread )
मुंबई काँग्रेस यामध्ये दोन गट :तसेच मुंबई काँग्रेस यामध्ये दोन गट असल्याचे देखील यावेळी समोर आले. प्रिया दत्त आणि संजय निरुपम हे दोघेही मुंबई काँग्रेसचे नेते यावेळी मंचावर उपस्थित नव्हते. सभेला देखील हजर नव्हते. ह्या बाबत काँग्रेस कार्यकर्ते बोरिवली ब्लॉक उपाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले की, संजय निरुपम आणि प्रिया दत्त यांना टाळून हा कार्यक्रम घेतला आहे. वास्तविक ते जुने जाणते नेते आहेत. शिवाय जनता देखील त्यांच्या सोबत आहे. ह्या नेत्यांनी अनेक कार्यकर्त्यांना सोबत न घेता हा कार्यक्रम आयोजित केला गेला.