महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीबीएसईच्या परिक्षेत पहिल्या ६ स्थानावर मुलींचीच बाजी, निकालात ०.३९ टक्क्यांची वाढ

सीबीएसईने यंदा बारावीचा निकाल केवळ २८  दिवसात जाहीर केला आहे. देशातील पहिल्या २३ टॉपरमध्ये १५ मुलींचा समावेश  आहे. तर पहिल्या सहाही स्थानावर राहून मुलींनी विक्रम केला आहे. सर्वाधिक निकाल हा केंद्रीय विद्यालयांचा आहे.  तर खाजगी शाळांच्या निकालात यंदाही घसरण झाल्याचे चित्र या निकालातून समोर आले आहे.

By

Published : May 2, 2019, 3:17 PM IST

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) मार्च - एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. देशभरातून यात ८३.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या परिक्षेत सुद्धा मुलींनीच अव्वल क्रमांक पटकावला आहे. खासगी शाळांची घसरण झालेली यावेळी पहायला मिळाली.

देशातून पहिल्या सहा आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचाच समावेश आहे. दिल्लीतील हंसिका शुक्ला आणि मुझफ्फरपुरची करिष्मा अरोरा या दोघी अव्वल आल्या आहेत. त्यांना ५०० पैकी ४९९ गुण मिळाले. देशातील पहिल्या २३ अव्वल विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही.


सीबीएसईच्या निकालात मागील वर्षाच्या तुलनेत ०.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९८.२० टक्के लागला. त्या खालोखाल चेन्नईचा निकाल ९२.९३ टक्के लागला. सर्वात कमी निकाल दिल्ली विभागाचा ९१.८७ टक्के लागला. देशभरातून सीबीएसई परिक्षेला १२ लाख ५ हजार ४८४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १० लाख ५ हजार ४२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सीबीएसईच्या या निकालात दिव्यांगांमधून हरियाणाची लावण्या बालकृष्णन ही देशात टॉपर ठरली. त्याखालोखाल केरळची निमिमी वेद, निश्चय कोहली, श्रेयश शहा या तीन विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ४८५ गुण मिळवून दिव्यांगातून दुसरा क्रमांक पटकावला. दिव्यांगातून देशभरात ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणारे २२५ विद्यार्थी आहेत. ९५ ते ९९ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही ३६ इतकी आहे.


९४ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण
यावेळी देशभरात ९० टक्के आणि त्यातून अधिक गुण‍ मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही वाढली आहे. यंदा देशभरात ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण हे ९४ हजार २९९ विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. ९५ ते ९९ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही १७ हजार ६९३ इतकी आहे.

खासगी शाळांची घसरण
सीबीएसईने यंदा बारावीचा निकाल केवळ २८ दिवसात जाहीर केला आहे. देशातील पहिल्या २३ टॉपरमध्ये १५ मुलींचा समावेश आहे. तर पहिल्या सहाही स्थानावर राहून मुलींनी विक्रम केला आहे. सर्वाधिक निकाल हा केंद्रीय विद्यालयांचा आहे. तर खाजगी शाळांच्या निकालात यंदाही घसरण झाल्याचे चित्र या निकालातून समोर आले आहे.


अशी आहे टक्केवारी

  • सरकारी अनुदानित : ८८.४९ टक्के
  • सरकारी शाळा : ८७.१७
  • खाजगी शाळा : ८२.५९
  • जवाहरलाल नवोदय विद्यालय : ९६.६२
  • केंद्रीय विद्यालय : ९८.५४
  • सीएसटीए(सेंट्रल तिबेटीयन अडमिनिस्ट्रेशन) : ९६.०४

ABOUT THE AUTHOR

...view details