मुंबई - इतरवेळी पाकिस्तानला शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा आयात करायचा हा भाजपचा दुतोंडीपणा असल्याचे वक्तव्य काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. हे सरकार शेतकरीविरोधी असून भाजपला फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता जास्त असल्याचेही ते म्हणाले.
'भाजप सरकार हे शेतकरीविरोधी, त्यांना फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता'
इतरवेळी पाकिस्तानला शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा आयात करायचा हा भाजपचा दुतोंडीपणा असल्याचे वक्तव्य काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले.
महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन) पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का उफाळून आले? असा सवालही थोरात यांनी केला आहे.
भाजपला शेतकऱ्यांची काही चिंता नाही. हे सरकार शेतकरीविरोधी असून भाजपला फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता असल्याचे थोरात म्हणाले. एमएमटीसीने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान, इजिप्त आणि अफगाणिस्तान या देशातून दोन हजार टन कांद्याची आयात करण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी निविदा काढली आहे.