मुंबई -देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या आठ दिवसांमध्ये राज्यात लॉकडाऊन घोषित करावा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा दिला आहे. त्याला अनुसरून प्रशासकीय स्तरावरसुद्धा काम केले जात आहे. राज्य कर्मचाऱ्यांना 50% उपस्थितीत काम करायचे आणि वर्क फ्रॉम होम करण्याचे नियोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक कार्यलयाकडून काढण्यात आलेल्या पत्रकानुसार पोलीस खात्यात आता 50 टक्के उपस्थितीसह वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात आले आहे.
100 टक्के अधिकारी उपस्थित राहणार, क व ड वर्गातील कर्मचारी वर्क फ्रॉम होम -