लातूर- मराठा समाजाला आरक्षण देताने ओबीसीच्या वाट्यातून देऊ नये, अशी मागणी करत ओबीसी समाजाने उदगीर- नळेगाव मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. राष्ट्रवादीचे मकरंद सावे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यापासून राज्यातील मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यापूर्वी आपले आरक्षण कायम ठेवण्यासाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी उदगीर- नळेगाव मार्गावर रास्तारोको करण्यात आला.
हेही वाचा-ओबीसींचा अंत पाहू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू- प्रकाश शेंडगे यांचा निर्वाणीचा इशारा
...तर ओबीसींवर अन्याय होणार!
राष्ट्रवादीचे नेते मकरंद सावे म्हणाले, की ओबीसी समाजाला आरक्षण असले तरी समाजाच्या दृष्टीने ते कमी प्रमाणात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला समता परिषदेचा विरोध नाही. तसेच ओबीसी समाजाचाही मराठा आरक्षणाला विरोध नाही. यापूर्वी मराठा- मुस्लिम मोर्चाच्या दरम्यान, ओबीसी समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी पाठिंबा दिलेला आहे. पण जर ओबीसीमध्ये आरक्षण दिले जाणार असेल तर त्याला विरोध हा कायम राहणार आहे. समता परिषदेच्या बैठकीत मंत्री छगन बुजबळ हेदेखील मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणीसाठी आग्रही आहेत. पण ओबीसींमध्ये हा समाज वाटेकरी झाला तर ओबीसींवर अन्याय होणार आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचे मकरंद सावे यांनी स्पष्ट केले आहे.