महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 24, 2020, 2:50 PM IST

Updated : Aug 24, 2020, 5:26 PM IST

ETV Bharat / state

चुकीच्या सांडव्यामुळे मोती तलाव कोरडा होण्याच्या मार्गावर

जालनेकरांसाठी महत्त्वाचा असलेला हा तलाव पाण्याने भरलेला राहावा म्हणून मागील दहा वर्षांपासून विविध सामाजिक संघटना आणि प्रशासनाने या तलावातील गाळाचा उपसा केला.त्यामुळे गेल्या वर्षी या तलावांमध्ये मोठा पाणी साठा साचला आणि या पाण्याचे जलपूजन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

less water remainig in moti talav due to wrong sandva at jalna
less water remainig in moti talav due to wrong sandva at jalna

जालना - शहराच्या सौंदर्यामध्ये भर घालणारा मोती तलाव सध्या पाण्याने पूर्ण भरलेला आहे. मात्र, पृष्ठभागापेक्षा जमिनीच्या खाली चर खोदून सांडवा काढून दिल्यामुळे या तलावातून लाखो लिटर पाणी निघून जात आहे. पर्यायाने येणाऱ्या काही दिवसातच भर पावसाळ्यात हा तलाव कोरडा पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

जालन्यातील मोती तलाव
जालनेकरांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून या मोती तलावाकडे पाहिले जाते. तसेच आता या तलावाच्या बाजूनेच बायपास रस्ता झाल्यामुळे या ठिकाणाचे महत्त्व ही वााढून सौंदर्यातही भर पडली आहे. यासोबत या तलावात भरपूर पाणी असल्यामुळे औद्योगिक वसाहत, योगेश्वरी कॉलनी आणि परिसरातील बोरला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. जालनेकरांसाठी महत्त्वाचा असलेला हा तलाव पाण्याने भरलेला राहावा म्हणून मागील दहा वर्षांपासून विविध सामाजिक संघटना आणि प्रशासनाने या तलावातील गाळाचा उपसा केला.त्यामुळे गेल्या वर्षी या तलावांमध्ये मोठा पाणी साठा साचला आणि या पाण्याचे जलपूजन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

हेही वाचा -...तर भारताकडे युद्धाचा पर्याय - बिपीन रावत

याचवेळी या तलावातून चुकीचा सांडवा काढून दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आणि लगेच त्यांनी पाहणी करून दहा मिनिटांमध्ये हा सांडवा बंद केला. त्यामुळे वर्षभर या तलावात पाणी साठा होता. आजही ही हा तलाव पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे. मात्र नगरपालिकेने तलावाच्या पृष्ठभागापेक्षा जमिनीमध्ये चर खोदून सांडवा काढून दिला आहे. त्यामुळे या हा तलाव झपाट्याने रिकामा होत आहे. गेल्या चार दिवसांपासून सांडवा मधून लाखो लिटर पाणी सोडून देण्यात आले आहे. याचा परिणाम आजच या तलावाची पाणी पातळी दीड ते दोन फूट खाली गेल्याचे दिसत आहे. जमिनीपेक्षा खाली खोल चर खोदून पाणी काढून दिल्यामुळे या तलावातील सर्व पाणी वाहून जाऊन तो कोरडा पडण्याची भीती पर्यावरण प्रेमी सह सामाजिक संघटनांनी वर्तविली आहे. पावसाचा थेंब न थेंब साठविण्याचे शासन प्रयत्न करत असताना साठवलेले हे पाणी नगरपालिकेने सांडव्यातून सोडून दिले आहे. हे पाणी सोडून नगरपालिका कोणाचे हीच जोपासत आहे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा -काँग्रेसमधील पक्ष नेतृत्वाच्या संघर्षाचा इतिहास, 'या'वेळी झाले होते वाद

Last Updated : Aug 24, 2020, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details