जालना -जालन्यातील 'मंठा सहकारी बँकेतील 28 हजार 536 खातेदारांना विम्याची रक्कम मंजूर झाली. यामध्ये 27 हजार 534 खातेदाराच्या खात्यात सुमारे 37 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. दरम्यान, हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शक्य झाले आहे. ( Mantha Cooperative Bank ) मोदींनी गरिबाच्यापोटी जन्म घेतला म्हणून त्यांना गरिबांची जाण आहे. तुमचे बुडालेले पैसे मिळाल्याबद्दल घरी जाताच शेजाऱ्यांना आणि मित्र मंडळींना चहा पाजून मोदींचे आभार माना असा सल्ला दानवे यांनी उपस्थित खातेदारांना दिला आहे.
दानवेंनी त्यांच्या खास शैलीत भाषण केले