महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चाळीसगावहून दुचाकीवर निघाले होते मित्र; देवळी-आडगाव फाट्याजवळ सापडले दोघांचे मृतदेह

वैभव आणि आदित्य हे दुचाकीवरून चाळीसगाव येथून मालेगावला जात होते. देवळी-आडगाव फाट्याजवळ त्यांची दुचाकी झाडावर आदळली. त्यात दोघेही जागीच ठार झाले.

By

Published : Mar 31, 2019, 6:15 PM IST

दुचाकी झाडावर आदळून चाळीसगावचे दोघे ठार

जळगाव - चाळीसगाव तालुक्यातील देवळी-आडगाव फाट्याजवळ दुचाकी झाडावर आदळून दोन तरूण ठार झाल्याची घटना आज (रविवार) दुपारी घडली. जिल्ह्यात २४ तासातच दुसरी अपघाताची घटना घडली. वैभव देशमुख आणि आदित्य वरसाळे अशी मृतांची नावे आहेत. दोघेही चाळीसगाव शहरातील हिरापूर रस्ता परिसरातील रहिवासी आहेत.


वैभव आणि आदित्य हे दुचाकीवरून चाळीसगाव येथून मालेगावला जात होते. देवळी-आडगाव फाट्याजवळ त्यांची दुचाकी झाडावर आदळली. त्यात दोघेही जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे चाळीसगावातील हिरापूर रस्ता परिसरात शोककळा पसरली आहे.

शनिवारी रात्री जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने रावेर तालुक्यातील सावदा येथील दोन तरुण ठार झाले होते. या घटनेला काही तासांचा अवधी उलटल्यानंतर चाळीसगाव तालुक्यातील पुन्हा अपघात घडला आहे. या अपघातात देखील दोघे दुचाकीस्वार ठार झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details