महाराष्ट्र

maharashtra

आम्ही कुस्ती खेळतो ती विरोधकांना पाडण्यासाठीच; यशपाल भिंगेंचा अशोक चव्हाणांना इशारा

आमच्याकडे पैसा,भांडवल आणि यंत्रणा नसली तरी कार्यकर्त्यांच्या जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्रात वंचितांचे सरकार येणार असल्याचे यशपाल भिंगे यांनी सांगितले.

By

Published : Sep 11, 2019, 10:52 PM IST

Published : Sep 11, 2019, 10:52 PM IST

यशपाल भिंगे

हिंगोली- युतीच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अजूनही प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांना हे माहीत असावं की, आम्ही जेव्हा कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरतो ते कुस्ती हरण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठीच उतरतो, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक यशपाल भिंगे यांनी केले. सत्ता संपादन महारॅलीसाठी ते हिंगोलीमध्ये आले होते.

यशपाल भिंगे, नेते वंचित बहुजन आघाडी

आम्ही ताकतीने लढणार आहोत, या मध्ये अजिबात गैर नाही. एवढेच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीला जनतेचा प्रतिसाद बघता आमचे सरकार निश्चित येणार आहे. तसेच आम्ही एकमेकांचे शत्रू तर अजिबात नाहीत. आमच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. तसेच आमच्याकडे पैसा नाही कुठलेही भांडवल नाही आणि यंत्रणा देखील नाही. हे सर्व जरी नसले तरीही राजकिय भूमिकेवर ठाम राहून प्रतिस्पर्धीला घायाळ करणार, चित्त करणार हे आमचं अंतिम ध्येय आहे, असे यशपाल भिंगे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीला जनतेचा आम्हाला असलेला प्रतिसादावरुन आम्ही सत्तेत येणार असल्याचे भिंगे यांनी सांगितले.

महारॅलीत सहभागी असलेले पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. एमआयएम पेक्षा ही जास्त मुस्लिम नेते विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना आम्ही प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वंचितच्या जोरावर खासदार झालेल्या इम्प्तीयाज जलील यांनीही हे लक्षात ठेवायला हवे. असा टोला पाटील यांनी लगावला.

हेही वाचा-वंचित बहुजन आघाडीतर्फे 'वंचित वारकरी सन्मान यात्रेचा' शुभारंभ

विचारांच्या जोरावर असलेली असलेली ही लढाई आम्ही जिंकू, असे देखील पाटील यांनी सांगितले. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नवे चेहरे सहभागी झाले होते. वंचित कडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले नवीन चेहरे अण्णाराव पाटील उमेदवारीबद्दल काय बोलतात याकडे लक्ष ठेवून होते.

ABOUT THE AUTHOR

...view details