महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीतील नरसी गावात नामदेवाच्या दर्शनासाठी गर्दी, ५ लाखाच्यावर भाविकांनी घेतले दर्शन

संत नामदेवाची जन्मभूमी असलेले नरसी नामदेव हे सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातून या ठिकाणी भाविक आषाढी एकादशी आणि परत वारीनिमित्त आवर्जून दर्शनासाठी हजेरी लावतात.

By

Published : Jul 28, 2019, 8:48 PM IST

नामदेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

हिंगोली - संत नामदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नरसी गावात नामदेवाच्या दर्शनासाठी परतवारी निमित्त भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटेपासून आतापर्यंत ५ लाखाच्यावर भाविकांनी दर्शन घेतले. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावे, यासाठी संस्थेच्यावतीने दर्शन रांगा बनविण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले.

संत नामदेवाची जन्मभूमी असलेले नरसी नामदेव हे सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातून या ठिकाणी भाविक आषाढी एकादशी आणि परत वारीनिमित्त आवर्जून दर्शनासाठी हजेरी लावतात. एवढेच नव्हे तर पंजाबमधून शीख बांधव देखील या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आज याठिकाणी पायदळी दिंड्या मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या, सोबतच हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले होते. जिल्ह्यात २ ते ३ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, पावसात देखील भाविक नामदेवाच्या दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावत असल्याचे पहावयास मिळाले.

परत वारी म्हणजे वारकरी संप्रदायासाठी अतिशय मोठा उत्सव असतो. त्यामुळे मंदिर संस्थानच्यावतीने आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासूच परतवारीची तयारी सुरू केली होती. पावसाचे वातावरण असल्याने दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांची पावसामुळे गैरसोय होऊ नये, म्हणून जागोजागी टिन पत्राची ही व्यवस्था केली होती.

पहाटेच्या सुमारास आज संत नामदेवांची पूजा करुन भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, समिती अध्यक्ष रामेश्वर शिंदे, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details