महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साडेबारा वाजताची सभा अन् मुख्यमंत्री पोहोचले सव्वाचारला, नागरिकांचा सभास्थानाहून काढता पाय

नागरिक सकाळी ११ वाजतापासून सभास्थळी ताटकळत बसले होते. मात्र, वाढत्या तापमानाने नागरिक चांगलेच हैराण झाले होते. पाणी-पाणी करून नागरिक ओरडत होते. मात्र, याठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे बरेच नागरिक कंटाळून उठून गेल्याचे पाहायला मिळाले.

By

Published : Apr 12, 2019, 9:25 PM IST

Updated : Apr 12, 2019, 10:51 PM IST

मुख्यमंत्र्यांची सभा सोडून जाताना नागरिक

हिंगोली - आखाडा बाळापूर येथे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभेचे आयोजन केले होते. सभा दुपारी साडेबारा वाजता पार पडणार होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सभेच्या ठिकाणी ४.१५ वाजता पोहोचले. मुख्यमंत्र्यांना येण्यासाठी उशीर होत असल्याने नागरिक सभास्थानाहून काढता पाय घेत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

मुख्यमंत्र्यांची सभा सोडून जाताना नागरिक

साडेबारावाजता मुख्यमंत्र्यांच्या सभेची आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी नागरिक सकाळी ११ वाजतापासून सभास्थळी ताटकळत बसले होते. मात्र, वाढत्या तापमानाने नागरिक चांगलेच हैराण झाले होते. पाणी-पाणी करून नागरिक ओरडत होते. मात्र, याठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे बरेच नागरिक कंटाळून उठून गेल्याचे पाहायला मिळाले.

Last Updated : Apr 12, 2019, 10:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details