महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चालकाच्या मृत्यूनंतर कंपनीला आली जाग; मागण्या पूर्ण करण्याचे दिले लेखी पत्र

आरोग्य विभागातील १०२ रूग्णवाहिकांच्या कंत्राटी वाहनचालकांनी वेतनाच्या मागणीसाठी गोंदिया येथील जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या वाहनचालकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे.

By

Published : Nov 26, 2019, 8:06 PM IST

gondia
आंदोलना दरम्यानची दृश्ये

गोंदिया- आरोग्य विभागातील १०२ रूग्णवाहिकांच्या कंत्राटी वाहनचालकांनी वेतनाच्या मागणीसाठी गोंदिया येथील जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या वाहनचालकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी घडली असून प्रेमभाऊ पिकलमुंडे असे मृत वाहनचालकाचे नाव आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर कन्नाटी कंपनीने वाहचालकांच्या मागण्यांना पूर्ण करण्याचे लेखी पत्र दिले आहे.

माहिती देताना अंशुल बर्डे, मुख्य व्यवस्थापक, अश्कोम मीडिया प्रा. लिमीटेड कंपनी

प्रेमभाऊ पिकलमुंडे हे भंडारा जिल्ह्यातील धोप येथील रहिवासी होते. ते मुंडीकोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहनचालक म्हणून कार्यरत होते. गर्भवती महिला व लहान मुलांना रूग्णसेवा देता यावी यासाठी आरोग्य विभागाकडून १०२ रूग्णवाहिका सेवा पुरविली जाते. शासनाने रुगवाहिकेची सेवा पुरवण्याचे कंत्राट मध्यप्रदेश राज्यातील भोपाल येथील अश्कोम मीडिया प्रा. लिमिटेड या कंपनीला दिला आहे. मात्र, सदर कंपनी रुग्णवाहिका चालकांना वेळेवर व नियमानुसार वेतन देत नाही. त्यामुळे, जिल्ह्यातील ७८ रूग्णवाहिकांच्या चालकांनी १८ नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलनाला सुरवात केली. या आंदोलनाला आठवडा लोटूनही कोणताही तोडगा निघाला नसल्याने वाहनचालकांनी आंदोलन सुरूच ठेवले.

मृतक प्रेमभाऊ पिकलमुंडे हे संपात सहभागी होते. मात्र, काही कारणास्तव ते एक दिवसाकरीत घरी गेले व सोमवारी आंदोलनात सहभागी होण्यासाठी धोप येथील आपल्या घरून निघाले. मात्र, वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यांना ताबडतोब भंडारा येथे नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने कंत्राटी वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती कंन्नाट घेतलेल्या मध्यप्रदेश राज्यातील भोपाल येथील अश्कोम मीडिया प्रा. लिमिटेड या कंपनीला कळताच कंपनीने तात्काळ कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकांना आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी पाठविले.

त्यानंतर व्यवस्थापकाने चालकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी पत्र दिले. दरम्यान, कंपनीने दुर्लक्ष न करता चालकांच्या मागण्यांकडे आधीच लक्ष दिले असते तर प्रेमभाऊ पिकलमुंडे या वाहन चालकाला आपला जीव गमवावा लागला नसता. त्याचबरोबर, वाहनचालकांच्या आंदोलनाचा गर्भवती महिला व बालकांना देखील फटका बसला नसता.

हेही वाचा-जलाशयाचे पाणी शेतात शिरल्याने ८० एकरातील धानाची नासाडी

ABOUT THE AUTHOR

...view details