महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 14, 2020, 11:41 AM IST

Updated : Mar 14, 2020, 11:57 AM IST

ETV Bharat / state

'तेलंगाणा सरकारकडून नुकसानभरपाई वसूल करून शेतकऱ्यांना मदत द्या'

मेडिगट्टा धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे तेलंगाणा सरकारकडून ही नुकसान भरपाई वसूल करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

MLA Dharmaraobaba Atram
आमदार धर्मरावबाबा आत्राम

गडचिरोली - दक्षिण गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगाणा सरकारने मेडीगट्टा बॅरेज उभारला आहे. मात्र, या प्रकल्पाच्या बांधकामात 1 हजार कोटींचा घोटाळा झाला. कुठलीही परवानगी घेतलेली नसताना महाराष्ट्रातील मुरूम उत्खनन केले जात आहे. या प्रकल्पाचे पाणी अडवल्याने सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे तेलंगाणा सरकारकडून ही नुकसान भरपाई वसूल करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

तेलंगाणा सरकारकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची मागणी

मेडीगट्टा सिंचन प्रकल्प गतवर्षी पूर्ण झाला. घाईघाईत या प्रकल्पाचे उद्घाटनही करण्यात आले. मात्र, या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकरी बाधित झाले आहेत. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांच्या जमिनींचे अगोदर भूसंपादन करणे गरजेचे होते. मात्र, असे न करता तेलंगाणा सरकारने प्रकल्पाचे उद्घाटन करून पाणी अडवले. परिणामी अनेकांच्या शेतात पाणी शिरुन रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

हेही वाचा -मुलाचे पदवीप्रमाणपत्र खोटे असल्याचे सिद्ध! गोवा उपसभापतींनी तत्काळ पायउतार होण्याची विरोधकांची मागणी

शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन आंदोलन केले. मात्र राज्य सरकार याकडे लक्ष देत नाही, असा मुद्दा आमदार आत्राम यांनी उपस्थित केला. सरकारला या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, यासाठी तेलंगाणा सरकारकडून वसुली केली जावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन विधानसभेत निवेदन करणार असल्याचे सांगितले.

Last Updated : Mar 14, 2020, 11:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details