परळी (बीड )उन्हाळा तोंडावर असतानाही परळीत असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रातील वीज निर्मिती मंगळवारपासून बंद करण्यात आली आहे. आर्थिक कारण देत औष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच बंद करण्यात आले आहेत. परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र. 6, 7, व 8 हे प्रत्येकी 250 मेगावॅट क्षमतेचे संच आहेत. या तिन्ही संचाची एकूण स्थापित क्षमता 750 मेगावॅट एवढी आहे. यापैकी संच क्रमांक 6 व 7 हे आज बंद करण्यात आले आहेत. तर संच क्रमांक 8 सुरू असून, त्यातून 180 मेगावॅट विजेची निर्मिती सुरू आहे.
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच बंद
परळीत असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रातील वीज निर्मिती मंगळवारपासून बंद करण्यात आली आहे. आर्थिक कारण देत औष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच बंद करण्यात आले आहेत. परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र. 6, 7, व 8 हे प्रत्येकी 250 मेगावॅट क्षमतेचे संच आहेत. या तिन्ही संचाची एकूण स्थापित क्षमता 750 मेगावॅट एवढी आहे. यापैकी संच क्रमांक 6 व 7 हे आज बंद करण्यात आले आहेत.
वाढलेला उत्पादन खर्च परवडत नसल्याने संच बंद
दरम्यान याप्रकरणी स्थानिक प्रशासनाकडे चौकशी केली असता, महाजनकोच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने संच बंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. वीज निर्मीतीसाठी आवश्यक कोळसा व कच्च्या मालावरील खर्च वाढलेला असून, वाढलेला उत्पादन खर्च कंपनीच्या आर्थिक धोरणांच्या निकषात बसत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे संच बंद करण्यात आले आहेत. दरम्यान याबाबत परळी विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की सध्या औष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच बंद ठेवण्यात आले आहेत. लवकरच ते सुरू करण्यात येतील.