महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यंदाही बारावी निकालात मुलींचीच बाजी; औरंगाबाद विभागात बीड दुसऱ्या क्रमांकावर

बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. बारावीच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी - मार्च २०१९ मध्ये पार पडली. या परीक्षेसाठी बीड जिल्ह्यातील ३७ हजार ८९० मुला - मुलींनी नोंदणी केली होती. पैकी जिल्ह्यातून एकूण ३८ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी  परीक्षा दिली. यात २३ हजार ८१५ मुले तर १३ हजार ९८० मुलींचा समावेश होता. यापैकी २० हजार ७०१ मुले व १२ हजार ६६२ मुली असे एकुण ३३ हजार ३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

By

Published : May 29, 2019, 3:16 AM IST

प्रतिकात्मक छायाचित्र

बीड- बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदाही बीडच्या मुलींनी बाजी मारली. औरंगाबाद विभागात बीड दुसऱ्या स्थानावर आहे. जिल्ह्याचा एकुण निकाल ८८.२७ टक्के इतका लागला आहे. दुपारी १ नंतर मुलामुलींनी निकाल पाहून आनंद व्यक्त केला. गतवर्षी मुलींनीच बाजी मारली होती.

फेब्रुवारी - मार्च २०१९ मध्ये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बीड जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. यंदा बीड जिल्हा औरंगाबाद विभागात दुसरा आला. जिल्ह्याचा एकुण निकाल ८८.२७ टक्के इतका लागला असून यात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.५७ तर मुलांच्या उत्तीणतेचे प्रमाण ८६.९२ इतकेच आहे.मागील वर्षींच्या तुलनेत जिल्ह्याचा निकाल अर्धा टक्क्याने घसरला आहे.

बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. बारावीच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी - मार्च २०१९ मध्ये पार पडली. या परीक्षेसाठी बीड जिल्ह्यातील ३७ हजार ८९० मुला - मुलींनी नोंदणी केली होती. पैकी जिल्ह्यातून एकूण ३८ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात २३ हजार ८१५ मुले तर १३ हजार ९८० मुलींचा समावेश होता. यापैकी २० हजार ७०१ मुले व १२ हजार ६६२ मुली असे एकुण ३३ हजार ३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

जिल्ह्यात यंदा विज्ञान शाखेतून एकुण १८ हजार २९९ मुले-मुली उर्त्तीर्ण झाले.यात १० हजार ७८४ विद्यार्थी प्रथम प्राविण्याने तर ५ हजार ९८८ विद्यार्थी व्दितीय प्राविण्याने उर्त्तीर्ण झाले आहेत. याशिवाय ९० विद्यार्थी कमी टक्यांनी परंतू उर्त्तीण झाले आहेत. कला शाखेतून ११ हजार ६७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात ७ हजार ४५३ प्रथम प्राविण्याने तर ३ हजार ६५२ मुले-मुली व्दितीय प्राविण्य मिळवू शकले. वाणिज्य शाखेतून एकुण २२३४ विद्यार्थी उर्त्तीण झाले असून जिल्ह्यात व्यवसाय अभ्यासक्रम शाखेतून ११५३ विद्यार्थी उर्त्तीण झाले.

औंरंगाबाद विभागनिहाय निकाल लक्षात घेतला तर यंदा पुन्हा औरंगाबाद विभागात बीड जिल्हा व्दितीय (८८.२७ टक्के) ठरला आहे. या विभागात औरंगाबादचा सर्वाधिक ८९.२२ टक्के निकाल लागला आहे. जालना जिल्हा ८७.१२ टक्के निकाल घेवून तिसर्‍या स्थानी राहिला आहे. तर ८४.५१ निकाल घेवून परभणी जिल्हा चौथ्या स्थानी आहे. विभागात सर्वात कमी ८०.७७ टक्के निकाल हिंगोली जिल्ह्याचा राहिला आहे. यंदा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली आली होती.

तालुकानिहाय निकाल

बीड तालुका : ९२.३७


पाटोदा : ९०.५०


आष्टी : ८६.९१


गेवराई : ८८.७४


माजलगाव : ८०.६७


अंबाजोगाई : ८१.४६


केज : ९३.८२


परळी : ७९.५१


धारूर : ८५.०२


शिरूर : ९१.३६


वडवणी : ९१.७१

ABOUT THE AUTHOR

...view details