औरंगाबाद -पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील पर्यटन स्थळावरील कचरा शहराची प्रतिमा मलिन करतो. ( Garbage in Aurangabad ) यामुळे पर्यटन स्थळे स्वच्छ करण्याची जबाबदारी आता शहरातील उच्छाशिक्षित तरुण तरुणींच्या औरंगाबाद प्लॉगर्स ग्रुपने घेतली आहे. ( Plogers Group Aurangabad ) प्रत्येक रविवारी हा ग्रुप पर्यटन स्थळावरील कचरा गोळा करतो आणि यानंतर महानगर पालिकेकडे हा कचरा जमा केला जातो. ( Plogers Group Collect Garbage Aurangabd ) सुरुवातीला हिणवल्या जाणाऱ्या या मुलांचे आता सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. ( Aurangabad Youth Collect Garbage )
14 महिन्यांपासून काम सुरू -
पर्यटनाच्या राजधानीत पर्यटन स्थळांवरील वाढते प्लास्टिक, दारुच्या बाटल्या यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांमध्ये शहराची प्रतिमा मलिन होत आहे. यामुळे औरंगाबाद प्लॉगर्स ग्रुपच्या वतीने शहरातील वर्दळीच्या ठिकाणी प्रत्येक रविवारी प्लास्टिक गोळा केले जाते. त्यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते आहे. गोळा केलेले प्लास्टिक कचरा संकलित केला जातो. शहरातील विविध ठिकाणी गेल्या १४ महिन्यांपासुन हा ग्रुप काम करत आहे.
400 सदस्य -
शहरातील उच्चशिक्षित निखिल खंडेलवाल या तरुणाने शहरातील पर्यटन स्थळावरील क्चरा समस्येवर मार्च २०२०मध्ये औरंगाबाद प्लॉगर्स ग्रुपची स्थापना केली. सुरुवातीला निखिल हा एकटाच हे काम करू लागला. त्यानंतर त्याचे भाऊ सहभागी झाले. हळुहळु ग्रुपची माहिती प्रत्येकाला मिळत गेली. आता ग्रुपमध्ये ४०० हुन अधिक सदस्य झाले आहेत. शहरातील गोगाबाबा टेकडी, वाल्मी तलाव हिमायतबाग, औरंगाबाद लेणी, हनुमान टेकडी, साई टेकडी, कॅनॉट प्लेस, आदी भागांतील प्लास्टिक कचऱ्याचे संकलन ग्रुपचे सदस्य करत आहेत. हिमायत बागेतील मोहिमेत सापडल्या आठ गोण्या प्लास्टीक तर २६४ मद्याचा बॉटल मिळाल्या.