औरंगाबाद- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली. त्यानंतर बाजारपेठांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.
पॉझिटिव्हीटी दर घसरल्याने नागरिक बिनधास्त -
दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये पॉझिटिव्हीटी दर 22 ते 23 टक्क्यांवर गेला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले होते. लग्न सोहळे बंद करत व्यवसाय करण्यावर निर्बंध लावले. विकेंड लॉकडाऊन असे प्रयोग राबवले, त्यानंतर राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लावले. त्यामुळे औरंगाबादच्या पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांहून कमी झाला आहे. त्यामुळे नागरिक बिनधास्त वावर करत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्य बाजारपेठ झाल्या हाऊस फुल -