औरंगाबाद - कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पैठणमध्ये आलेल्या संदिपान भूमरे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पैठणकरांनी भुमरेंचे जल्लोषात स्वागत केले. भूमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना व फलोत्पादन खाते देण्यात आले आहे.
पैठणच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि संभाजीनगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला आपले पहिले प्राधान्य राहणार असल्याचे भूमरे यांनी सांगितले. तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेल्या वर्षी आजच्या तारखेला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण कामाची पायाभरणी झाली होती. हेच औचित्य साधून रविवारी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा फुलांनी सजवून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.