महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरधाव ट्रकने ९ जणांना चिरडले; घटना सीसीटीव्हीत कैद

औरंगाबादमध्ये भरधाव ट्रकने ९ जणांना चिरडले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला.

By

Published : Mar 3, 2019, 6:34 AM IST

ट्रकने ९ जणांना चिरडले

औरंगाबाद - भरधाव ट्रकने ९ जणांना उडवल्याची घटना औरंगाबादेत समोर आली आहे. हडको कॉर्नर ते चंपाचौक असा तब्बल ५ ते ६ किलोमीटर ट्रकचालकाने रस्त्यातील वाहनचालकांना चिरडले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

शेख मोहसीन शेख अमीन (वय २६) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शेख इमाम शेख (वय २६) हा गंभीर जखमी झाला आहे. शेख इमाम याचा एक हाथ आणि एक पाय तुटली आहेत.

ट्रकने ९ जणांना चिरडले

संतप्त नागरिकांनी वाहनावर दगडफेक केली असून यामुळे ट्रकच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान, नागरिकांच्या मदतीने जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details