अहमदाबाद - येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेला चौथा आणि अखेरचा कसोटी सामना भारतीय संघाने तीनच दिवसात जिंकला. एक डाव आणि २५ धावांनी हा सामना जिंकत भारतीय संघाने चार सामन्याच्या मालिकेत इंग्लंडचा ३-१ ने धुव्वा उडवला. तसेच भारतीय संघाने या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. लंडनच्या ऐतिहासिक लॉड्स मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात महामुकाबला होणार आहे. या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून भारतीय संघावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह माजी क्रिकेटपटू तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी भारतीय संघाचे कौतूक केलं आहे.
हेही वाचा -WTC Final : क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार
भारताच्या विजयानंतर मान्यवरांनी केलेले ट्विट...