महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'जिवलगा' निर्णायक टप्प्यावर, विधी-निखिलच्या नात्याला आता कोणतं वळंण मिळणार?

काव्या आणि निखिलच्या प्रेमप्रकरणाबद्दलचा विधीचा संशय खरा ठरला आहे. त्यामुळे विधी आणि निखिलच्या नात्याला आता कोणते वळण मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. विधीसाठी ही गोष्ट नक्कीच धक्कादायक आहे.

By

Published : May 30, 2019, 12:47 PM IST

जिवलगा निर्णायक टप्प्यावर, विधी निखिलच्या नात्याचं पुढे काय होणार..?

मुंबई -छोट्या पडद्यावर सध्या 'जिवलगा' ही मालिका लोकप्रिय होत आहे. स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, मधुरा देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर, अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या मालिकेत वेगवेगळी वळणं पाहायला मिळतात. या मालिकेची चकचकित मांडणी आणि मोठे कलाकार यामुळे अल्पावधीतच प्रेक्षकांची पकड घेण्यात मालिका यशस्वी ठरली आहे. आता ही मालिका निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे.

काव्या आणि निखिलच्या प्रेमप्रकरणाबद्दलचा विधीचा संशय खरा ठरला आहे. त्यामुळे विधी आणि निखिलच्या नात्याला आता कोणते वळण मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. विधीसाठी ही गोष्ट नक्कीच धक्कादायक आहे. सुखी संसाराला दृष्ट लागावी अशीच, काहीशी घटना विधीच्या आयुष्यात घडली आहे. या कठीण प्रसंगात विधी काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आता वाढली आहे.

विधीप्रमाणेच विश्वासचीदेखील अवस्था अशीच आहे. काव्या आणि निखिलच्या नात्याविषयी त्याला कल्पना असली, तरी आता त्याने याविरोधात ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. काव्या आणि निखिलला त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी विश्वास आणि विधी काय निर्णय घेतात हे आता 'जिवलगा'च्या येत्या भागात पाहायला मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details