मुंबई- दिग्गज आणि प्रख्यात लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची महाभारतावर आधारित चित्रपट कथा लिहिण्यासाठी आमिर खानसोबत चर्चा झाली होती. आमिर खूप दिवसापासून महाभारतावर आधारित पौराणिक चित्रपट मालिका बनवण्याच्या तयारीत आहे.
प्रसाद यांनी 'बाहुबली' या चित्रपटाचे लेखन केले होते. एसएस राजमौली यांच्या विख्यात चित्रपटाचे कथाकार म्हणून त्यांचा लौकिक आहे. के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी 'बजरंगी भाईजान' आणि 'मणिकर्णिका- द क्विन ऑफ झांसी' या चित्रपटांचीही कथा लिहिली होती.
''महाभारत बनवण्याबद्दल माझ्यात आणि आमिर खान याच्यात चर्चा सुरू होती. आम्ही स्क्रिप्टवर कामही सुरू केले होते. त्याबद्दल आता काही भाष्य करणे उचित ठरणार नाही,'' असे विजयेंद्र यांनी म्हटले.