महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nitin Gadkari on Congress party काँग्रेसमध्ये सहभागी होण्यापेक्षा, नितीन गडकरींनी केले मोठे वक्तव्य

भाजपने केलेल्या या बदलातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे नितीन गडकरी यांची संसदीय मंडळातून हकालपट्टी केली आहे. मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळात ते अतिशय लोकप्रिय मंत्री राहिले आहेत. Reconstitution of BJPs parliamentary board रस्ते आणि वाहतूक मंत्रालयातील त्यांच्या कामाची बरीच चर्चा झाली आहे.

By

Published : Aug 29, 2022, 9:56 AM IST

Updated : Aug 29, 2022, 11:10 AM IST

नितीन गडकरी
नितीन गडकरी

नागपूरमाझ्या मित्राने मला एकदा काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला. मी म्हणालो, काँग्रेस पक्षात जाण्यापेक्षा मी विहिरीत Nitin Gadkari on Congress party बुडेल. मला काँग्रेसची विचारधारा आवडत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari reaction on congress यांनी म्हटले आहे. ते नागपुरात उद्योजकांच्या मेळाव्यात बोलत होते.

रिचर्ड निक्सन यांचा हवाला देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले की, एखादी व्यक्ती पराभूत झाली की संपत नाही, तर तो जेव्हा राजीनामा देतो तेव्हा तो संपतो. व्यवसाय, सामाजिक कार्य किंवा राजकारणातील प्रत्येकासाठी मानवी नातेसंबंध हे सर्वात मोठे सामर्थ्य आहे, असेही ते म्हणाले. म्हणून, एखाद्याने कधीही वापरा आणि फेकून देऊ नये. चांगले दिवस असो किंवा वाईट दिवस, एकदा तुम्ही कोणाचा हात धरला की तो सोडू नका. केवळ उगवत्या सूर्याची पूजा करू नका, असे भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटले. गडकरींनी आठवण करून दिली की ते विद्यार्थी नेते असताना काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांनी त्यांना चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये येण्यास सांगितले होते. याबाबत नितीन गडकरी म्हणाले, की मी श्रीकांतला सांगितले की, मी विहिरीत उडी मारून मरेन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, कारण मला काँग्रेस पक्षाची विचारधारा आवडत नाही.

संघर्ष करण्यात सकारात्मकता असावीतरुण उद्योजकांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या आत्मचरित्रातील वाक्य लक्षात ठेवावे की, माणूस पराभूत झाला की संपत नाही, तर तो लढा सोडल्यावर संपतो, असे गडकरी म्हणाले. भाजप नेते तथा नितीन गडकरी म्हणाले, की यशाचा आनंद फक्त एकट्यालाच होत असेल तर निरर्थक आहे. इतरांनाही आनंद होत असेल तर खरे यश आहे. संघर्ष करण्यात सकारात्मकता असावी. अनेकांकडून शिकायला मिळते. चांगल्या गोष्टीवर कुणाचेही पेटंट नसते. त्यापासून आपण सुधारणा करू शकतो.

गडकरी बाहेर असतानाफडणवीसांना एंट्री भाजपने केलेल्या या बदलातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे नितीन गडकरी यांची संसदीय मंडळातून हकालपट्टी केली आहे. मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळात ते अतिशय लोकप्रिय मंत्री राहिले आहेत. Reconstitution of BJP's parliamentary board रस्ते आणि वाहतूक मंत्रालयातील त्यांच्या कामाची बरीच चर्चा झाली आहे. शिवाय, पक्षाच्या माजी अध्यक्षांना संसदीय मंडळात कायम ठेवण्याची परंपरा आहे, जी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या हकालपट्टीनंतरच संपली. मात्र नितीन गडकरींसारख्या सक्रिय आणि तगड्या नेत्याला येथून हटवणे धक्कादायक आहे. मात्र, समतोल साधत भाजपने नितीन गडकरींच्या जागी देवेंद्र फडणवीस यांची बढती करून त्यांचा केंद्रीय निवडणूक समितीत समावेश केला आहे.

काय म्हणाले होते गडकरीदोन आठवड्यापूर्वी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटले होते की, मला खूप वेळा राजकारण सोडावसे असे वाटते. आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. तसेच, राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे असही ते म्हणाले होते. दरम्यान,नितीन गडकरी हे अनेक दिवसांपासून भाजपमध्ये बाजूला असल्याचे दाखवत आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका असो किंवा यंदाच्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका. प्रचारात किंवा अन्य कोणत्याही भूमिकेत ते कुठेच दिसले नाहीत.

हेही वाचाNational Sports Day 2022 राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्टला का होतो साजरा, जाणून घ्या

Last Updated : Aug 29, 2022, 11:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details