महाराष्ट्र

maharashtra

25 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

राज्यातील तरुण वर्ग कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती.

By

Published : Apr 5, 2021, 10:15 PM IST

Published : Apr 5, 2021, 10:15 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई -राज्यातील तरुण वर्ग कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन, लसीकरणाचा वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत असेही या पत्रात म्हटले आहे. मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो, त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल असेही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्रात पुढे म्हटले आहे की, राज्याने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती मांडली असून, चाचण्याचा वेगही प्रयत्नपूर्वक वाढवला आहे. प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झालाच पाहिजे या निर्धाराने आम्ही उपाययोजना करीत आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक हानिकारक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ब्रेक दि चेन या मोहिमेच्या माध्यमातून काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र यात जीवनावश्यक वस्तू व सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहील आणि कोविडसाठी आरोग्याचे नियम सर्वजण पाळतील अशी कार्य पद्धती ठरविली आहे. असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, कोविड लसीकरणास राज्याने अतिशय गांभीर्याने घेतले असून, काल ४ एप्रिलपर्यंत ७६.८६ लाख जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. ३ एप्रिल रोजी राज्यात सर्वाधिक म्हणजे ४.६२ लाख जणांना लस देण्यात आली.

दीड कोटी डोस मिळावेत

लसीकरणाचा वेग वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहेच, पण त्यासाठी केंद्राने जादा डोस देखील द्यावेत अशी विनंती या पत्रात मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या ६ जिल्ह्यांसाठी केवळ 3 आठवड्यात ४५ वर्षांपुढील सर्वाना लस देण्याची आमची तयारी आहे, याकरिता दीड कोटी डोस मिळावेत अशी मागणी या पत्रात मुख्यमंत्र्यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या सहाय्याने आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नाने या संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल, असा विश्वासही या पत्रात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -वृद्ध कोरोनाबाधिताला ११ तासांनंतरही मिळाली नाही रुग्णवाहिका; अखेर...

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details