मुंबई - राज्यात आज १५ हजार ४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १३ हजार ७०२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात झाली. ३२६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत ११ लाख ४९ हजार ६०३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.६४ टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या २ लाख ५५ हजार २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१ लाख ११ हजार २०४ नमुन्यांपैकी १४ लाख ४३ हजार ४०९ नमुने पॉझिटिव्ह म्हणजेच २०.२९ टक्के आले आहेत. राज्यात २२ लाख ०९ हजार ६९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २७ हजार ९३९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले
आज नोंद झालेल्या एकूण ३२६ मृत्यूंपैकी २१४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ५७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५७ मृत्यू सातारा – २२, पुणे– ७, ठाणे – ५, यवतमाळ – ५, जळगाव – ३, सिंधुदुर्ग - २, नागपूर- २, परभणी – २, अहमदनगर – १, बीड – १, धुळे – १, गोंदिया – १, जालना– १, नांदेड – १, रायगड– १, सोलापूर– १ आणिभंडारा-१, असे आहेत.