मुंबई :शिवसेनेतील ( Rebellion in Shiv Sena ) बंडाळी नंतर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यात युतीबाबत संभाषण झाल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. शिवसेनेकडून तो फेटाळला होता. दीपक केसरकर ( Deepak Kesarkar )यांनी यावरून आज संताप व्यक्त करत, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) ऐवजी अनिल परब (Anil Parab) यांचा फोन तपासा. सगळं उघड होईल, असे खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये वादाला तोंड फुटणार ( Deepak Kesarkar Vs Shivsena ) आहे.
बंडखोरांवर जोरदार टीकास्त्र :एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे कमालीचे आक्रमक झाले असून, बंडखोरांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. निष्ठा यात्रानंतर, शिवसंवाद यात्रेतून बंडखोरांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या आरोपांची आदित्य ठाकरे चिरफाड करत आहेत. ठाकरेंच्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नाशिकमध्ये बंडखोर आमदार सुहास कांदे यांनाही शिवसैनिकांच्या आक्रमकतेपुढे काढता पाय घ्यावा लागला. ठिकठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या यात्रेचे जोरदार स्वागत होत असल्याने, एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीका करणारा शिंदे गट आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत आहे.
युतीच्या मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर :शिवसेना आणि भाजपची युती व्हावी, यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रयत्न करत होते. विधानसभेत भाजप आमदारांवर केलेल्या कारवाईमुळे चर्चा फिस्कटली, असे गंभीर विधान खासदार राहुल शेवाळे यांनी केले होते. शिवसेनेकडून हे आरोप खोडून काढण्यात आले. मात्र शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत युतीच्या मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आणला आहे.