मुंबई- एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांविरोधात आणि मंत्र्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयमध्ये ( Mumbai High Court )आज सोमवार जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका उत्पल बाबुराव चंदवार आणि इतर लोकांनी कायदेतज्ञ ऐडवोकेट असीम सरोदे यांच्यावतीने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या मंगळवार सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतर आमदारांच्या विरोधात आपल्या कर्तव्याचा निर्वाहन न करण्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. मंत्र्यांना तातडीने मंत्रालयातील कार्यालयात हजर राहण्याची निर्देश उच्च न्यायालयाने देण्यात यावे असे याचिकेत म्हटले आहे.
महाराष्ट्रातील काही सजग नागरिकांची ॲड. असीम सरोदे यांच्या मदतीने जनहित याचिका- एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांना त्वरित त्यांचे कार्यालयात रुजू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने द्यावेत. जनतेचे महत्वाचे विषय दुर्लक्षित करून, अनॉफ़िशल कारणांसाठी न सांगता राज्यातून निघून जाणे बेकायदेशीर ठरते.
संविधानातील वेळापत्रक तीन नुसार मंत्र्यांनी शपथ घेतलेली असते, की ते जनतेप्रती असलेल्या कर्तव्यात कसूर करणार नाहीत. मुख्यमंत्री तसेच त्यांच्या विभागाचे सचिव यांना न सांगता इतर राज्यात निघून जाणे व जनतेची अनेक कामे खोळंबून राहणे हा मंत्र्यांनी केलेला सामाजिक उपद्रव आहे, असेही याचिकेत नमूद करण्यात आलेले आहे.