मुंबई- मुंबईतील जुहू परिसरामध्ये ११ नोव्हेंबर रोजी एका चार महिन्याच्या मुलाच अपहरण झाले होते. त्यानंतर त्याला विकण्यासाठी तेलंगाणा राज्यातील नलगोंडा सरूर नगर याठिकाणी नेण्यात आले. या अपहरण प्रकरणी तीन आरोपींना मुंबईच्या जुहू पोलिसांनी अटक करत चार महिन्याच्या मुलाची सुखरूप सुटका केली आहे.
हेही वाचा - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत केला खून; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
चार लाखात केला होता सौदा
११ नोव्हेंबर रोजी जुहू पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका गरीब कुटुंबातील चार महिन्याच्या मुलाचं अज्ञात आरोपींनी अपहरण केल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत गुप्त माहितीच्या आधारावर तपास केला असता सदर चार महिन्याच्या अपहरण तीन आरोपींनी केली असून या चार महिन्याच्या मुलाला विकण्यासाठी तेलंगणा येथील नलगोंडा येथे नेण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. या चार महिन्याच्या मुलाचं ४ लाख रुपयात सौदा करण्यात आलेला होता. मात्र, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक करत मुलाची सुखरूप सुटका करून त्याचा ताबा त्याच्या आईला परत केला आहे.
हेही वाचा - जालन्यात तिजोरी चोरट्याला २४ तासात अटक, सदर बाजार पोलिसांची कारवाई