मुंबई - अमरावती शहरातील राजापेठ येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीबाबत वाद सुरू आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावर ठाम आहेत. मात्र, शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी नियमावली आखून दिलेली आहे. पुतळा उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. नियमावलीचे पालन करून पुतळा उभारला गेला पाहिजे. महापुरुषांच्या पुतळ्यांची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. मात्र, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून काही लोक जाणून बुजून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil comment on Rajapeth Shivaji Maharaj statue ) यांनी सांगितले. आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे आवाहन शिवप्रेमींना केले.
हेही वाचा -VIDEO : ट्रकची स्कूटरला धडक; ११ वर्षाच्या मुलीचा मृत्यू तर दुसरी मुलगी जखमी
नियमावलीनुसार शिवजयंती साजरी करा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सर्वांच्याच मनात प्रेम आणि आदर आहे. मात्र, अद्याप कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. कोरोनाची महामारी कोणताही जात, धर्म पहात नाही. तसेच, कोणत्याही धर्माला पाहून नियमावली तयार केलेली नाही. त्यामुळे, दिलेल्या नियमावलीचे पालन करूनच सर्वांनी शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जनतेला केले आहे.
एक पक्ष सोडून इतर पक्षांच्या नेत्यांवर धाडी