महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 6, 2021, 9:28 AM IST

ETV Bharat / city

अनिल देशमुखांना पुन्हा ईडी कोठडी की जामीन? आज फैसला!

अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीचा आज शेवटचा दिवस आहे. अनिल देशमुखांना जामीन मिळणार का पुन्हा त्यांच्या कोठडीत वाढ होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अनिल देशमुखांना पुन्हा ईडी कोठडी की जामीन? आज फैसला!
अनिल देशमुखांना पुन्हा ईडी कोठडी की जामीन? आज फैसला!

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून 13 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीचा आज शेवटचा दिवस आहे. अनिल देशमुखांना जामीन मिळणार का पुन्हा त्यांच्या कोठडीत वाढ होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अनिल देशमुख यांच्यावर आरोप
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावले. तर परमबीर सिंग यांच्याविरोधात विविध ठिकाणी खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल झाले. ठाणे पोलिसांनी सिंग यांना चौकशीसाठी बोलावले, पण त्यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांनी सिंग यांच्याविरोधआत लुकआऊट नोटीस बजावली होती.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री अनिल देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1 हजार 750 बार आणि रेस्टॉरेंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात, तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रे लिहून हे आरोप केले होते.

परमबीर सिंग यांचा यूटर्न
महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करत अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावे सादर करणार नसल्याचं म्हटलंय.

ऋषिकेश देशमुख यांना ईडीचं समन्स
ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी सकाळी 11 वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ईडीचे अधिकारी ऋषिकेश देशमुख यांची कसून चौकशी करतील, अशी शक्यता होती. मात्र, ऋषिकेश देशमुख गुरुवारी ईडीसमोर हजर झाले नसून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details