मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत, आमचं खत चांगलं आहे; त्यामुळे महाराष्ट्र्र हिरवागार आणि भगवा होणार, अशी प्रतिक्रिया देऊन शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंच्या हस्ते रविवारी अंधेरीतील मरोळमध्ये पालिकेच्या मैदानात झाडे लावण्याचा कार्यक्रम पार पडला. युवासेना प्रमूख आदित्य ठाकरे यांच्यासोबत 1100 नागरिकांच्या हस्ते एकाच वेळी अकराशे झाडे लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. आज मी लावलेले हे विकासाचे झाड आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आमचं खत सगळीकडे चांगलं असून, पावसाचे इनकमिंग होऊ दे, असं त्यांनी म्हटलंय.