कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ईटीव्ही भारतच्या बातमीची दाखल घेत कर्नाटकात प्रवास करण्यास राज्य महामंडळच्या बसेसना परवानगी दिली आहे. आज साडेचार वाजता कोल्हापूर-बेळगाव बससेवा सुरू करण्यात आली, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळातील डिटीओ शिवराज जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादानंतर दोन्ही राज्याकडून एसटी सेवा बंद केली होती. मात्र, कर्नाटक सरकारने त्यांच्या एसटीला महाराष्ट्रात प्रवास करण्यास परवानगी दिल्याने कर्नाटक एसटी अक्षरशः महाराष्ट्रातील प्रवासी ओढून नेट होते. त्यावर' ईटीव्ही भारत' ने 'कर्नाटकने प्रवासी पळवले, महाराष्ट्र चीडीचूप' अशी बातमी प्रसारित केली होती. त्याची दखल घेत आज एसटी महामंडळाकडून कर्नाटक राज्यात बेळगाव मार्गावर ४.३० वाजल्या पासून एसटी सुरू केली आहे.