महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 19, 2020, 8:57 PM IST

ETV Bharat / business

'ही' कंपनी कोरोनाच्या लढ्याकरता भारताला देणार ११.५ कोटी रुपये

क्वालकॉम इंडियाचे उपाध्यक्ष राजन वगाडिया म्हणाले, की आपण अभूतपूर्व अशा परिस्थितीमध्ये जगत आहोत. या वेळेला सर्वांना एकत्रित येत को रोनाविरोधात लढायला हवे, असे वगाडिया यांनी म्हटले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

नवी दिल्ली - क्वालकॉम इंडिया या चीप तयार करणाऱ्या कंपनीने कोरोनाच्या लढ्यात भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी भारताला १.५ दशलक्ष डॉलर (सुमारे ११.३ कोटी रुपये) देणार आहे.

क्वालकॉमने आर्थिक मदत ही पीएम केअर्स फंडमधून आणि विविध सार्वजनिक मदतनिधीमधून देणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी ही मदत करण्यात येणार असल्याचे क्वालकॉमने म्हटले आहे. कोरोना चाचणीचे किट्स, स्क्रीनिंग, पोलिसांसह डॉक्टरांना पीपीई आणि सॅनिटायझर देणे आणि गरजूंना अन्न पुरविणे यासाठीही मदत करण्यात येणार आहे.

हेही वाचा-कोरोनाचे संकट : महाराष्ट्रासह आठ राज्यांच्या जीडीपीवर होणार ६० टक्के परिणाम

क्वालकॉम इंडियाचे उपाध्यक्ष राजन वगाडिया म्हणाले, की आपण अभूतपूर्व अशा परिस्थितीमध्ये जगत आहोत. या वेळेला सर्वांना एकत्रित येत कोरोनाविरोधात लढायला हवे.

हेही वाचा-कोरोनाच्या संकटात मदत; महिंद्राने वाहन खरेदीकरिता 'ही' आणली अनोखी योजना

ABOUT THE AUTHOR

...view details